अणुकराराच्या मुद्द्यावरुन रान उठवणा-या भाजपाने आज आपली भुमिका काहीशी बदललेली दिसते.
एनडीए सत्तेत आल्यास, यूपीएने स्वाक्षरी केलेल्या अणुकराराकडे सहजपणे कानाडोळा करता येणार नाही, असे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले असल्याने, अणुकरारावरून नाके मुरडणाऱ्या आणि विरोधाचे नारे देणाऱ्या भाजपच्या विरोधाची धार काहीशी बोथट झाल्याचे दिसते.
NDA सत्तेत आल्यास US बरोबर अणुकरार Re-Negotiate केला जाइल, असं पुर्वी यशवंत सिन्हा यांनी म्हटलं होतं. आणि आता अडवानी म्हणत आहेत की, "agreements signed by previous government cannot be disregarded easily". [:d]
यशवंत सिन्हा म्हणाले होते, "NDA अणुकरार re-negotiate करेल".
.
याच बद्दल अडवाणींना विचारले तर ते म्हणतात की, "I will not like to say anything at this point. I will leave it to the government to take a decision."
.
"How we deal with the Indo-US nuclear treaty is a matter which can be considered (when) in the government," he said".
.
अश्या दुटप्पी भुमिका का ?
संदर्भ - म टा आणि The Statesman
No comments:
Post a Comment