Wednesday, March 14, 2012

शिवाजी - रामदास संबंध :- प्रा. त्र्यं.शं. शेजवलकर

आपल्या प्रस्तावित शिवचरित्राच्या प्रस्तावनेत थोर इतिहासकार प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी शिवाजी - रामदास संबंधी काही विवेचन केले आहे. ते पुढील प्रमाणे -

"
शिवाजीला आपले कार्य रामदासाच्या उपदेशानंतर सुचले असे नाही. याबाबत भोंगळ रामदासी लेखकांनी केलेला बोभाटा व्यर्थ आहे.दासबोधातले काही दशक शिवचरित्रांतील विशिष्ट प्रसंगांना उद्देश्युन लिहिले गेले, असे म्हाणण्याला स्पष्ट पुरावा ग्रंथांत कोठेही नाही. ओढूनताणून शब्दांचे अर्थ लावून याबाबत केलेला प्रयत्न खात्री पटविणारा नाही. रामदास व शिवाजी हे दोघेी पुरुष समर्थ व कर्तबगार होते. त्यांचा कालांतराने परस्परमित्रभावही जडला. पण त्याचा सुपरिणाम इतकाच की, शिवाजीच्या मनाला प्रपंचांतील क्लेशांपासून त्या़ची मुक्तता होऊन आंतरिक समाधान लाभले व संसाराच्या विचित्र रहाटीबद्दल त्याची समजुत पडून स्थितप्रज्ञाप्रमाणें शांत मनाने देहत्याग करण्याची तयारी त्याला करता आली.

या दोघांच्या संबंधांबाबत हनुमानस्वामींचे रामदासचरित्र भलत्याच काल्पनिक गोष्टी सांगते....पण त्यात विश्वसनीय भाग फारच थोडा दिसतो. त्याच्या आधारावर आधुनिक ब्राम्हणांनी शिवाजीच्या गुरुत्वाचे मोठेपण स्वत:च्या जातीला चिटकविणे ही तर भ्रमिष्टपणाची पराकोटी म्हटली पाहिजे. पण अश्या बालीश चाळ्यांत महाराष्ट्रातील शहाण्यासुरत्या लोकांनी तीन पिढ्य़ा कालापव्यय केला व लोकांना चुकीच्या मार्गावर हिंडविले, ही गोष्ट इतिहासात विसरता येण्यासारखी नाही. या हुल्लडीला इतिहासलेखक, तत्वज्ञानी, कादंबरीकार, निबंधकार, कवी सर्वच कमीजास्त प्रमाणात बळी पडले व समाजावर त्याचा मोठा अनिष्ट परिणाम घडला हे नमूद केले पाहिजे.
.....
 ....
रामदासांचे लिहिणें काही ठिकाणीं विचित्र, दुर्बोध, अर्थहीन आहे असे भासते. मागच्यापुढच्या ग्रंथाशी त्याचा संबंध दाखविता येत नाही. असे उतारे रामदासांनी शिवचरित्रातील विशिष्ट प्रसंगी लिहून शिवाजीकडे सूचना म्हणुन पाठविले, असे म्हणण्याला भक्तांना सवड होते व त्याचाच उपयोग करुन रामदास शिवाजींच्या काल्पनिक संबंधांची इमारत उभी करण्यात आली आहे. हनुमानस्वामींनी लगट करुन, ’सिऊबा’ सारखे घरगुती शब्द दोघांच्या संबंधांत योजून, त्यांची फार घसट होती, असा आभास उत्पन्न केला आहे. तोच कित्ता आधुनिक लेखकांनी गिरवून, शिवाजीचे सर्व चरित्र रामदासांनी आखल्याप्रमाणे चालले होते, अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदासांनी ठिकठिकाणी असंख्य मठ स्थापून शिवाजीच्या स्वारीचा रस्ता त्यांच्या अनुरोधाने ठरविला होता; तेच सर्व बातम्या काढीत व शिवाजीकडे कळवीत; निरोप इकडून तिकडे नेत, अशी रचना कादंबरीकारांनी व गोष्टीवेल्हाळांनी करुन इतिहासकाराचे काम स्वत:कडे खेचले आहे. त्यांना मदत म्हणुन अंध संशोधकांनी, रामदासांनी अखिल हिंदुस्थानची यात्रा बारा वर्षे केली; शेकडो मठ प्रांतोप्रांती स्थापिले; रामदासी उपदेशक सर्वत्र फैलाविले, अशा वार्ता अल्प आधारावर प्रदीर्घ प्रचलित केल्या आहेत. पण त्यांना अस्सल आधार. नि:शंक पुरावा थोडाच मिळाला आहे. बाकी सर्व इच्छापूर्तीचा व कल्पनेचा खेळ आहे. एवढा खटाटोप पन्नास वर्षे करुनही रामदासांच्या चरित्रांत स्पष्ट घडामोडींची भर पडू शकलेली नाही. तर्कावरच सर्व मदार ठेवण्यात आलेली आहे. ....
....
असेच सर्व आयुष्यभर चालून, रामदासांच्या शिष्यांमुळे शिवाजी आग्र्याहून सुरक्षित परत येतो; राज्याभिषेकाची युक्ती रामदासच त्याला सुचवितात; गागाभट्टासारखा महापंडित दासांपुढे लीन होतो, वगैरे वगैरे सांगणे क्रमप्राप्तच झाले. मात्र संभाजीच्या स्वेच्छाचाराविरुद्ध स्वामींना काही एक करता येत नाही. सज्जनगडाहून तो त्यांच्या दृष्टीसमोर मोगलांकडे पळून जातो., इत्यादी क्षुल्लक गोष्टी कोठे या चरित्रात येऊ द्यायच्या नाहीत एवढी काळजी घेतली म्हणजे झाले!
...
...
रामदासी पंथांत राजकारण अनस्युतच असते, तर ते इतिहासात कोठे ना कोठे दिसलेच असते. रामदास हे अनभवी, पुष्कळ पाहिलेले व ऐकिलेले शहाणे पुरुष होते.....पण स्वत:ची प्रत्येक गोष्ट समर्थांना सांगून मग शिवाजी आचरणात आणी, असे म्हणण्यास काहीही आधार नाही. फार कशाला, परमार्थाबाबतही शिवाजी याकूतबाबा किंवा मौनी महाराज यांना भेटला तो प्रथम रामदासांच्या कानावर ती गोष्ट घालून, असे कोणी मानील काय? ...

.. रामदासी पंथ खरोखरीच शिवाजीच्या कार्याला पोषक म्हणुन निघाला असता तर एका पिढीत त्याचे कार्य खलास झाले नसते. ते झाले याचा अर्थ तो हिंदुधर्म तारण्यासाठी  काढलेला राजकारणी पंथ नव्हता हेच ठरते....अतएव रामदासी पंथाने काही ऐतिहासिक राजकीय कार्य महाराष्ट्रात घडवून आणले, हा प्रवाद युरोपच्या इतिहासाच्या वडाची साल पिंपळाला चिकटविण्याचा अव्यापारेषु व्यापार करणा-या काही इंग्रजीशिक्षित कल्पकांच्या मेंदूची विकृती आहे. खोट्या जात्याभिमानाने आत्मतुष्टी निर्माण करण्याचा तो एक खोडसाळ प्रयत्न आहे, असे गेल्या पाऊणशे वर्षांतील एतद्विषयक लिखाणावरुन ठरते.

....पेशवाईत रामदासी पंथाचा फारसा प्रसार झाल्याचे आढळत नाही. कोणीही पेशव्यांचे लक्ष समर्थांनी वेधून घेतल्याचे नमूद नाही. पेशव्यांच्या ग्रंथशाळेत दासबोधाच्या प्रतीची नोंद नाही. पेशवाईच्या अखेरीस रामदासस्वामींची बखर हनुमानस्वामींनी सजविल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या कौतुकास पुन: उजाळा मिळाला. सभासदाला आपल्या बखरीत रामदासांचे नावही कोठे आणण्याची जरुरी भासली नाही. यावरुन समकालीनांत शिवचरित्रावर दासांच्या कर्तृत्वाची विशेष छाप पडली होती, असे दिसून येत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी चिटणीसांनी आपल्या बखरीत रामदास आणिले. त्यांच्या आख्यायिकेस इंग्रजी इतिहासातही स्थान मिळाले. पण शिवचरित्रात रामदासांचा बोलबाला एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नव्याने पुढे आलेल्या इतिहास संशोधकांनी केला. रानड्यांच्या अंभूत भक्तिभावामुळे महाराष्ट्र संतांच्या कार्याला ऐतिहासिक अधिष्ठान लाभले. त्यातूनच संतांच्या कार्याची छाननी सुरु होऊन प्रार्थना समाज प्रभृती सुधारक पंथीयांनी तुकारामाचा उदो उदो आरंभिला. यांत ब्राम्हणांवर प्रच्छन्न टिका असल्यामुळे ब्राम्हणाभिमानी सनातन पक्षाने रामदासांनी पुढे आणिले व त्यांच्याकडे शिवकालीन, नव्हे शिवाजीच्या उदयाची मुख्य कामगिरी सोपविली.

नवे नवे कागद पुढे आणणारे व त्यांचा गूढार्थ बारकाईने सांगणारे इतिहास संशोधकच रामदासांची पाठ पुरविणारे झाल्यामुळे सामान्य वाचकांचा - आणि हे वाचक ब्राम्हणादी पांढरपेशे होते - सहजच समज असा होऊन बसला की, शिवाजीच्या कार्याची आखणी मुख्यत:समर्थांनी केली. राजवाड्यांसारख्या प्रतिभावान तिखट लेखकाने या मताचा पुरस्कार व प्रचार हाती घेतल्याने त्यांच्या भोळ्या भाबड्या भक्तांनी तोच क्रम उगाळण्याचे काम सर्वत्र चालू ठेविले. त्यामुळे हा समज जनमनात दृढ होऊन बसला आहे. पण मुळातच त्याला अस्सल आधार अत्यल्प असल्याने त्या पायावर एवढा मोठा इमला उभा करणे शक्य नाही.

.. ब्राम्हणांनी इतिहासाचा हा जो नवा डोलारा उभारिला त्याला मुळातच बिलकुल आधार नव्हता हे त्यांनी झाकून ठेविले आणि महाराष्ट्रातील सर्व वाङ्मयीन जगत त्यांच्याच सत्तेखाली असल्याने तसे करणे शक्य झाले. पुढे केळुसकरांसारखे साक्षेपी मराठे स्वत: बखरी वाचून पाहू लागले तेव्हा त्यास आढळले की, एकाही ऐतिहासिक बखरीत शिवाजीने रामदासांच्या झोळीत राज्य टाकल्याची कथा नाही ! अर्थातच त्यांच्या मते छत्रपती व शिवाजी यांचा संबंध परमार्थसाधनेपुरता उरला. पण हे म्हणणे इतिहास संशोधकास अमान्य. म्हणून त्यांनी त्या ग्रंथावरच वाळी घातली. म्हणजे केळुसकरांचे पुस्तक ब्राम्हणांत वाचले गेलेच नाही असे झाले. आणि ही प्रथा आजवर महाराष्ट्र वाङ्मयात चालू आहे.
"
  
संदर्भ - निवडक शेजवलकर, श्रीशिवछत्रपतींचे चरित्र- दोन उतारे, पृ. क्र. १७ ते ४३, साहित्य अकादमी

Friday, March 9, 2012

एका गांधी टोपीचा प्रवास

" कधी एखादा हिंदुत्ववादीही यायचा. हे लोक हिंसावादी असल्याचा आव आणीत. तोंडाने भगतसिंग, सावरकर पृभूतीची तारीफ करीत. परंतु त्यांचे हाथ पिस्तुलाशी न जुळता, account generalचे office, post, railway, revenue dept असल्या सरकारी चाकरीत लेखणी घासण्यात गुंतलेले असायचे.

गांधीजींच्या चळवळीत फार मोठ्या प्रमाणात बहुजनसमाज आला होता. हजारोंच्या संख्येने बायका सत्याग्रहात शिरून तुरुंगात चालल्या होत्या. हिंदुत्ववाद्यांना समाजाच्या सर्व थरातले हे चैतन्य महत्वाचे वाटत नव्हते. या मंडळीत एक विलक्षण नतद्रष्टेपणा असायचा. राजकीय चळवळ म्हणजे एक व्यासपीठ, दोन खुर्च्या, मग अध्यक्षाचे फर्डे भाषण, आभार हीच या लोकांची कल्पना होती. वाचावीरच स्वराज्य मिळवून देयील. फार तर कुणीतरी ५-१५ bomb वगैरे फेकावे.( स्वतःचा मुलगा मात्र नसावा. त्याला कुठेतरी चिटकवून द्यायची तयारी चाललेली असायची.)

वेळोवेळी इतिहासाच्या पूर्वदिव्यात घुसायच-असली काहीतरी चमत्कारिक वृत्ती असलेली हि माणसे! त्यात काही मंडळी " काय म्हणतोय तुमचा गांधी?" अस विचारून " एकून सारा पोरखेळ चाललाय" असा शेरा मारून जायचे. बाबू गेनू नावाच्या एका मजुराने परदेशी कापडाची लॉरी पुढे जावू देणार नाही या निर्धाराने स्वतःला त्या खाली चिरडून घेतले होते. हि असली उदाहरणे डोळ्यापुढे घडत असतानाही, हि चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत पोचलेली आहे याची जाणीव या गांधी द्वेषाने अंध झालेल्या मंडळीना येत नव्हती.

गांधीजीचा मुसलमानधार्जीनेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांच्या नीषेधापेक्षा, मुसलमान गुंडांनी केलेल्या अत्याचारांच्या वेळी त्यांच्या लेखणीला आणि वाणीला विशेष धार चढे. बरे, हिंदू-मुस्लीम दंगलीत कधी हि मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणाव तर तेही नव्हत.

हे येरू वगळले तर त्या काळी, आम्हा अनेकांच्या आयुष्याचे कर्णधार महात्मा गांधी होते.


---------- पु ल देशपांडे.
( एका गांधी टोपीचा प्रवास from खिल्ली.)

गांधी, कॉंग्रेस आणि गांधीवाद

गांधीवाद हा समाजवाद, भांडवलवाद ह्यांसारखा वाद नाहीये. तो हिंदु धर्माचं खरं इंटरप्रेटेशन आहे. त्याच्या अनुषंगांने समाजात लोकांनी कसं जगावं.. कसं वागावं..समाजव्यवस्था कशी असावी, अर्थव्यवस्था कशी असावी..राज्यव्यवस्था कशी असावी ह्याबद्दलची गांधींची मतं आहेत आणि ती त्यांनी त्यांच्या अनुभवातुन, निरिक्षणातुन बनवली होती...त्यांनी त्याचा प्रचार केला.... लोकांनी त्या मतांचा आदर केला [follow नाही केलीत].

गांधींमागे लोकं का गेली ह्याचे उत्तर गांधीवादात नाहीये...तो फ़ारसा लोकांना कळला नाहीच कधी. पण लोकांना त्या व्यक्तीबद्दल खात्री होती. तो जे म्हणतोय तसं केल्याने आपला उद्धार होईल हे त्यांना जाणवत होतं. म्हणुन त्यांना प्रत्येक राजकिय चळवळीत प्रचंड जनाधार मिळाला.

गांधींच्या जनाधाराचा, संघटन कौशल्याचा फ़ायदा कॉंग्रेसच्या नेत्यांनी पुरेपुर उचलला...एका जिल्ह्याचे नेते व्हायची लायकी नसलेले लोकं प्रमुख नेते म्हणुन पुढे आले. सत्ताधीश झालेत. लोकांपुढे फ़क्त गांधींची जपमाळ ओढुन आपणच खरे गांधीवादी म्हणुन त्या लोकांनी मिरवले. आणि लोकांनाही गांधीवादातला ’ग’ ही माहित नसल्याने ते कॉंग्रेसच्या मागे फ़रफ़टत गेले.

एकतर गांधीवाद माहित नाही...वरुन कम्युनिस्ट आणि फ़ॅसिस्ट संघटनांनी गेले ८० वर्ष गांधींबद्दल अपप्रचार सुरु ठेवलाय त्याचाही थोडा परिणाम झालाच आणि गांधी हळुहळु बदनाम होत गेले. पण एक ’लगे रहो मुन्नाभाई" आला आणि वातावरण पुन्हा बदलले. गांधीबद्दलचे प्रेम भारतीयांच्या मनात इतके खोलवर रुजलंय की त्यांची बदनामी सिरिअसली घेणेही भारतीय टाळतो. गांधी हा साधारण माणुस होता...कोणी अद्वितीय विचारवंत, विद्वान नव्हता हे भारतीयांना माहिती आहे. पण जसा आपल्या घरातला वृद्ध माणसाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण आदर बागळुन असतो, तसाच आदर भारतीय गांधींबद्दल बाळगुन आहेत.

-----------

धीजींची ताकद हीच की ते भारतीयांचे पाणी पुरेपूर जोखून होते. क्रांती, स्वातंत्र्य वगैरे नवविचार भारतीयांना कितपत आणि कुठवर झेपतील याचा अंदाज गांधीजींना सर्वात चांगला होता. त्यांचा पंचा हासुद्धा (तत्कालीन) भारतीयांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नांचाच भाग समजला पाहिजे. नेता म्हणजे कुणीतरी भारदस्त, तेजस्वी, परग्रहावरून आल्यासारखा माणूस या समजाला गांधींनी छेद दिला.
त्यांचे स्वातंत्र्यप्राप्तीचे उपायही साधे सोपे असत. "तुम्हाला दांडीयात्रेत यायचे असेल तर माझ्यासोबत चाला. इंग्रजांच्या लाठ्या खा. ते जमत नसल्यास घरी चरखा चालवून देशाला बळ द्या. तेसुद्धा जमत नसेल तर परमेश्वराकडे आमच्या आंदोलनाला यश यावे म्हणून प्रार्थना करा." देशातल्या लहानातल्या लहान माणसाला त्यांनी काही ना काही कार्यक्रम दिला होता. आपल्या अनुयायांना इतके समजून घेणारा नेता दुसरा नसेल.
गांधीजी साधे होते, ते या अर्थाने. 
- ज्ञानेश पाटील

--------

स्वातंत्र्य आपोआप कुठुन मिळेल? इतक्या चळवळी, इतके सत्याग्रह स्वातंत्र्य मागण्यासाठी नव्हते? १९४२ ला दिलेला चलेजावचा नारा देण्याइतके आत्मिक बल कुठुन आले?

स्वातंत्र्याला आपण लायक आहोत याची पुरेपुर खात्री पटल्याशिवाय १९३० साली कॉंग्रेसने दिलेला पुर्ण स्वातंत्र्याचा नारा गांधींना विश्वासात न घेताच आला? १९३१ साली गोलमेज परिषदेत स्वातंत्र्य मागायला गांधी उगाच गेले होते का?
१९२२ च्या चौरीचौरा प्रकरणामुळे चळवळ मागे घेणाऱ्या गांधींना पुढच्या सात-आठ वर्षात खात्री पटली की भारतीय स्वातंत्र्याला लायक आहेत असं ह्या मधल्या काळात कुठले लोकपरिवर्तन झाले होते?

’भारतीय लोकांना स्वातंत्र्याला लायक बनविणे’ असं गांधींना वाटणं म्हणजे आपण स्वत: कोणीतरी महान आहोत असा विचार त्यांच्या मनात असला पाहिजे. स्वत:ला महान समजण्याइतके गांधी लहान अजिबात नव्हते.

गांधी जे वैयक्तिक आयुष्य जगले त्याचे अनुकरण किती कॉंग्रेसी नेत्यांनीही केलं असेल याची एकदा यादी करुन बघावी. लोकांनी तर सोडाच बहुतांश कॉंग्रेसीनीही गांधीवाद कधीही आचरला नाही.

कितीही कटु असले तरी सत्य हेच आहे की गांधींच महत्व हे लोकांना राजकिय चळ्वळीत ओढुन आणण्याइतकंच होतं. गांधीवाद भारतीयांच्या पचनी कधी पडलाच नाही, पण त्याबद्दल आदर मात्र नक्कीच होता, कारण गांधीचे विचार हे पारंपारीक भारतीय संस्कारांपेक्षा वेगळे नव्हतेच कधी. फ़क्त त्याचा उपयोग राजकिय-सामाजिक स्तरावर करण्यात लोकं कचरत होती. एकदा संघटन मिळाले तेव्हा लोकं आपोआप बाहेर पडलीत.

गांधींचं मुख्य कार्य हे संघटन बनवुन लोकांना सामर्थ्य देण्यात होतं. पण याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्यचळवळ की गांधीवादाने लढली गेली किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत गांधीवादी मार्गाने गेला.

गांधी हा एक महान तत्ववेत्ता आहे असं कधी त्यांच्या अनुयायांनीही मानलेलं नाही. जेव्हढं पटतं तेव्हढंच घेतलं. पण पटत नाही म्हणुन त्यांचा तिरस्कार कोणीही केला नाही. उलट त्यांच्या मतांचा आदरच लोकांनी केला. गांधी हा धर्माचा सच्चा ’फ़ॉलोवर’ असाच त्याचा अर्थ होता


- शैलेंद्र पाटील

-------
 

Thursday, March 8, 2012

सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना

] सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.

२] सावरकर ब्रिटीश सैन्यभरतीत मदत करत होते. तरीही २.५ लाख ते २५ लाख इतक्या प्रमाणात झालेल्या भरतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता हे विधान चुकीचे आहे.

३] आझाद हिंद सेनेविरुद्ध कुठली बटालियन लढत होती हा मुद्दा गैरलागु आहे...कारण सैन्याची उपलब्धता वाढल्याने कोणाला कुठे पाठवावं हा ऑप्शन ब्रिटीशांकडे होता. तेव्हा ब्रिटीश सैन्यभरतीमुळे आझाद हिंद सेनेचा फ़ायदा होणार होता हा मुद्दा हास्यास्पद आहे.

४] सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिस्ट-सोशलिस्ट विचाराचे होते, आणि त्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात केली. म्हणुनच कॉग्रेस अंतर्गत असलेल्या समाजवादी गटातुन त्यांना पाठींबा मिळणे बंद झाले. ह्यात गांधीगटाचे राजकारण एव्हढेच की त्यांनी ह्या स्थितीचा फ़ायदा उचलला व कार्यकारणीत सुभाषचंद्रांना एकाकी पाडले. राजकारण ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही.

५] पहिली आ्झाद हिंद सेना ही जपान्यांच्या हेतुंबद्दल संशय निर्माण झाल्याने तुटली होती. त्याचे नेते मोहन सिंग हे नंतर आझाद हिंद सेनेत कधीही परतु शकले नाही...जपान्यांनी ते होऊ दिलं नाही.

६]रासबिहारींच्या नेतृत्वाला सेना जुमानत नव्हती आणि म्हणुन सुभाषचंद्रांकडे संपुर्ण नेतृत्व गेलं. लीगचंही आणि सेनेचेही. तरीही ४० हजारांपैकी फ़क्त १२ हजार सैन्य दुसऱ्या आझाद हिंद सेनेत परत आलं.

७] ब्रिटीश इंडियन आर्मीचं स्ट्रक्चर पाहता ते धार्मिक नव्हे तर भाषिक/भौगोलिक/वांशिक आधारावर होती. त्यात हिंदु मुस्लिम असा विचार करुन आधीच फ़ाळणी होणार हे गृहित धरुन हिंदु सैन्याची भरती करायला सावरकर सरसावले ही कमालीच्या दुरदृष्टीची गोष्ट होती. कारण निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर १९४० साली मुस्लिम लीगने पाकिस्तानची भुमिका अधिकृतपणे जाहीर केली. सावरकरांनी मात्र याआधीच सैन्यभरतीला सुरुवात केली होती.
-----

तेव्हा हिंदु मतदारसंघ आणि मुस्लिम मतदारसंघ असे प्रकार होते. हिंदु मतदारसंघात फ़क्त हिंदु मतं देणार आणि मुस्लिम मधे फ़क्त मुस्लिम.

मुस्लिम मतदारसंघातही कॉंग्रेसने संपुर्ण स्वीप केला होता.

जीना, सावरकर प्रभुतींचे राजकारणातील स्थान नगण्य होते.
मुस्लिम लीगशी हिंदु महासभेने युतीदेखील केली होती.

सुभाषचंद्र बोस यांना झटपट सत्ता हवी होती. त्यांची राजकारणातली प्रगती काही स्वत:च्या जीवावर होती का?
देशबंधु चित्तरंजन दास, मोतीलाल नेहेरु ह्या स्वराज्य पार्टीच्या अपयशानंतर त्यांच्या चेल्यांनी म्हणजे नेहेरु-बोस इत्यादींनी समाजवादाचा डोस कॉंग्रेसला दिला आणि स्वत:चे स्थान समाजवादी लाटेत मजबुत करुन घेतले.

व्यक्तीगत कारणांमुळे नेहेरुंना ह्याकाळात कॉंग्रेसी राजकारणात फ़ारसे लक्ष देता येत नसे. नेहेरु-बोस ही समाजवादी जोडगोळीपैकी बोस ह्यांच्याकडे आपोआपच कॉंग्रेसचे नेतृत्व गेले.

गांधीगट ह्या राजकारणात बराच मागे पडला होता. सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत इत्यादी मंडळींना डावलुन निर्णय घेणारे सुभाषचंद्र नंतर जर्मन दुतावासाच्या संपर्कात आले. कधी एकदा सत्ता हाती येते असं समाजवादी मंड्ळींना झालं होतं.


समाजवादी कार्यकर्ते कितीही वाढले तरी कॉंग्रेसचा हुकुमी एक्का गांधीच होते. त्यांच्या संमतीशिवाय कार्यकारणीचे कुठलेही निर्णय होऊ शकणार नाहीत असा ठराव कार्यकारणीमधे पटेल, पंत प्रभुतींनी पास करुन घेतला. सुभाषचंद्रांचा सर्वात मोठा पराभव तोच होता. त्यांच्याच समाजवादी साथींनी त्यांना दगा दिला.

राजकीय हाराकिरी करुन सुभाषबाबु राजीनामा देऊन बसले. मग समाजवाद्यांचे कडबोळे बनवायचा प्रयत्न. जर्मनीने रशियावर हल्ला केल्याबरोबर ह्या कडबोळ्यातुन मार्क्सिस्ट बाजुला झाले. सुभाषबाबुंना नव्या मित्रांची गरज पडली. राजकारणातले सगळे दोर कापले गेले होते. त्यांचे पलायन, आझाद हिंद सेनेची स्थापना, जपानची मदत ह्या सगळ्या गोष्टींमागे सर्वात आधी सत्ता काबीज करायचीच इर्षा होती. ह्याच सत्तास्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने त्यांचा काटा काढला असावा. हाच प्रतिस्पर्धी पुढे गांधी-पटेल प्रभुतींचा गेम करुन भारताचा सत्ताधीशही झाला.

सावरकर ह्या संपुर्ण राजकारणातले एक छोटेसे खिलाडी होते.

------------

सुभाषचंद्र बोस यांचे राजकारण पहिल्यापासुनच गटबाजीचे होते. समाजवादी कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांचा आणि नेहेरुंचा मोठा वाटा होता. ह्याच समाजवाद्यांच्या जोरावर ते अध्यक्षपदी येऊ शकले. पहिल्यांदा सर्वसहमती होती कारण त्यांचे राजकारण अजुन कोणाला नीटसे कळले नव्हते.

अध्यक्षपदावर येताच त्यांनी जर्मन दुतावासाची संपर्क साधायला सुरुवात केली. त्याआधी केलेल्या युरोप दौऱ्याने ते फ़ॅसिझ्म आणि कम्युनिझ्ममुळे इतके प्रभावित झाले होते की कॉंग्रेसला त्यांनी त्याच वळणाने न्यायचा प्रयत्न सुरु केला. आणि अर्थात हे सगळं ज्यांनी कॉंग्रेस संघटना ज्यांनी उभी केली होती त्या गांधीगटाला अंधारात ठेऊन.

पुढची निवडणुकही सुभाषचंद्रांनी जिंकली कारण कॉंग्रेस अध्यक्ष हाच मतदारयादीही बनवतो. आजही कॉंग्रेस अध्यक्षाला हरवणं अशक्य आहे. सिताराम केसरी शरद पवारांना ५००० विरुद्ध ९०० अशा मतांनी हरवु शकतात कारण केसरी लोकप्रिय आहेत म्हणुन नाही.

बरं निवडणुक जिंकल्यावर कार्यकारणीमधे गोविंद वल्लभ पंतांनी गांधींना व्हेटो द्यायचा ठराव मांड्ला. सुभाषबाबुंच्या विरोधानंतरही कार्यकारणीतल्या सगळ्या समाजवाद्यांनी गांधींना व्हेटो द्यायला पाठींबा दिला.
ह्यापेक्षा मोठी हार ती काय असते? सुभाषचंद्रांनी राजीनामा दिला.

सुभाषभक्ती बाजुला ठेऊन पुर्ण घटनाक्रमाचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की सुभाषचंद्रांची राजकिय अपरिहार्यता होती म्हणुन त्यांनी आझाद हिंद सेना वगैरेंचा खटाटोप केला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोकं सरदार पटेलांना हिरो मानतात तेच लोकं सुभाषचंद्रांच्या कार्यकारणीतील पराभवाचे प्रमुख सुत्रधार सरदार पटेल हेच होते हे विसरतात.

राजकारणात नेहेमी गट असतात. कोणी जिंकतो कोणी हारतो. त्यात हिरो-व्हिलन नावाचा प्रकार नसतो. सुभाषचंद्र बोस हे काही हिरोही नव्हते आणि व्हिलनही. देशभक्ती, स्वातंत्र्य हे केवळ राजकारणातले मुद्दे होते तत्कालीन नेत्यांसाठी.

---------------

विचारसरणीमुळे इतिहास बदलत नसतो....काही विचारसरणीचे लोकं मात्र इतिहासाला आपल्या विचारसरणीनुसार वाकवायचा प्रयत्न करतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सावरकर स्वत:च..जे भारताला सनातन काळापासुन राष्ट्र मानतात...त्यासाठी सोयीस्कर संदर्भ देतात..सोयीस्करपणे अनेक बाबींकडे दुर्लक्ष करतात.

सावरकरवाद्यांचंही हेच चाललंय आता.

दुसऱ्या महायुद्धात झालेली सैन्यभरती काय सावरकरांमुळेच झाली फ़क्त? ब्रिटीश सरकार अतोनात प्रयत्न करत होतं त्यासाठी सोबतीला कम्युनिस्ट, मुस्लीम लिग होतेच...नोकरीसाठी अनेक जण त्याकाळातही उत्सुक होतेच. महायुद्धापुर्वी फ़क्त अडीच लाख भारतीय सैन्य होतं....महायुद्धानंतर ते २५ लाख होतं.

आझाद हिंद सेना मात्र ४५ हजारांच्या पुढे कधी जाऊ शकली नाही.

कोणी कोणाची किती मदत केली? 

-------------

१] महायुद्धापुर्वीचं सैन्य : २.५ लाख
महायु्द्धानंतरचं सैन्य: २५ लाख.

असं गृहित धरा कि सावरकरांमुळेच हि सगळी सैन्यभरती झाली (बाकी इतक्या प्रमाणात भरतीसाठी ब्रिटीश सरकार, जीना, कम्युनिस्ट वगैरेंना फ़ारसे यश नसते मिळाले सावरकर नसते तर).

आझाद हिंद सेनेतले सगळे ४५ हजार सैन्यदेखील सावरकरांनीच पुरवले असंही मान्य करुयात (वादासाठी).

आझाद हिंद सेनेला ४५ हजार आणि ब्रिटीशांना २२.५ लाख सैन्य उभारण्यात मदत केलेल्या सावरकरांना ह्या दोघांच्या लढाईत कोण जिंकावे असं वाटत असेल?
आझाद हिंद सेना? आझाद हिंद सेनेला जर जिंकवायचे होते तर ब्रिटीशांना इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्यभरतीला मदत का करावी?

२] ४५ हजार सैन्यानिशी ब्रिटीशांना पराभुत करत आझाद हिंद सेनेने इंफ़ाळ पर्यंतची मजल मारली होती ह्यावर जर कोणाचा ’विश्वास’ असेल तर त्याला काय म्हणावं हेच कळत नाही. जपानी सैन्य काय फ़क्त गंमत बघायला बरोबर होतं? जपानी सैन्य किती होतं ह्याचा आकडा आहे कुणाकडे?

-----------------

आझाद हिंद सेनेची निर्मीती
मोहन सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना ही प्रथम इंडियन इंडिपेंडन्स लीगची सैनिकी शाखा म्हणुन स्थापण्यात आली होती. त्यात ४० हजार सैन्य होते जे सगळे जपानचे प्रिझनर्स ऑफ़ वॉर होते.

इंडियन इंडिपेंडन्स लीगचे मुख्य नेते रासबिहारी बोस होते.

तीन महिन्यातच मोहन सिंग ह्यांना जपान्यांच्या हेतुंवर शंका येऊ लागली. रासबिहारींशी त्यांचे ह्याबाबत मतभेद झालेत. आणि त्याची परिणीती मोहन सिंग ह्यांच्या हकालपट्टीत झाली. बहुतेक सैनिकांनी सेनेचा त्याग करुन प्रिझनर्स ऑफ़ वॉरचे स्टेटस पुन्हा घेतले.

ही सगळी पडझड रोखण्यासाठी जपान्यांनी सुभाषचंद्र बोसांकडे इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेना ह्या दोघांचे नेतृत्व सोपवले. बरेचसे लोक परतले. सुरुवात झाली १२००० सैन्याने. पुढे आणखी पुर्वाश्रमीचे सैनिक आणि सिव्हिलियन मिळून आणखी २८-३० हजार सैन्य जमवले गेले. एकुण संख्या ४० हजारांच्या आसपास होती. फ़ार फ़ार तर ४५०००. ह्या संख्येमधे फ़ारशी भर नंतर पडतांना दिसली नाही.

आझाद हिंद सेनेमधेही हिंदु-मुस्लिम असा भेदभाव नव्हता. सेनेच्या दोन सैनिकी डिव्हिजन्स होत्या. एकाचं नेतृत्व मोहम्मद जमान कियानी आणि दुसरीचं नेतृत्व अझीझ अहमद ह्यांच्याकडे होते.

पहिल्या डिव्हिजनच्या चारपैकी दोघांचं म्हणजे गांधी रेजिमेंटचे नेतृत्व हे इनायत कियानी आणि सुभाष रेजिमेंटचे नेतृत्व हे शहानवाझ खान ह्यांच्याकडे होते.
 -----------

सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिझम चे उघड समर्थक होते. १९३० साली मेयरपदी निवडुन आलेल्या भाषणापासुन ते १९४४ साली केलेल्या टोकियोतील भाषणापर्यंत त्यांना फ़ॅसिझ्म प्रिय होता.

त्यांनी निर्माण केलेल्या सोशलिस्ट आघाडीला कम्युनिस्ट सोडुन गेले कारण जर्मनीने रशियावर केलेला हल्ला. जितके कम्युनिस्ट रशिया धार्जिणे होते तितकेच सुभाषबाबु जर्मनधार्जिणे. 

फ़ॅसिझ्म आणि सुभाषचंद्र
As early as 1930 -- in his inaugural speech as mayor of Calcutta -- the fervent young Bose first expressed his support for a fusion of socialism and fascism:

“... I would say we have here in this policy and program a synthesis of what modern Europe calls Socialism and Fascism. We have here the justice, the equality, the love, which is the basis of Socialism, and combined with that we have the efficiency and the discipline of Fascism as it stands in Europe today.”

in late 1944 -- almost a decade-and-a-half later -- in a speech to students at Tokyo University, he asserted that India must have a political system "of an authoritarian character. . . To repeat once again, our philosophy should be a synthesis between National Socialism and Communism." 
फ़ॅसिझम वरुन नेहेरुंशी मतभेद
Bose went on to note that Nehru had said in 1933: "I dislike Fascism intensely and indeed I do not think it is anything more than a crude and brutal effort of the present capitalist order to preserve itself at any cost." There is no middle road between Fascism and Communism, said Nehru, so one "had to choose between the two and I choose the Communist ideal."

To this Bose responded:

“The view expressed here is, according to the writer, fundamentally wrong. . . One is inclined to hold that the next phase in world- history will produce a synthesis between Communism and Fascism. And will it be a surprise if that synthesis in produced in India?... In spite of the antithesis between Communism and Fascism, there are certain traits in common. Both Communism and Fascism believe in the supremacy of the State over the individual. Both denounce parliamentary democracy. Both believe in party rule. Both believe in the dictatorship of the party and in the ruthless suppression of all dissenting minorities. Both believe in a planned industrial reorganization of the country. These common traits will form the basis of the new synthesis. That synthesis is called by the writer "Samyavada" -- an Indian word, which means literally "the doctrine of synthesis or equality." It will be India's task to work out this synthesis.”


--------------------


२२ जून १९४० रोजी सावरकर-सुभाषचंद्रांची भेट होण्यापूर्वी जवळजवळ १ वर्ष आधीपासून म्हणजे जुलै १९३९ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर परदेशी जाण्याचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्यांना रशियात जायचं होतं. त्यामुळे १९४० च्या आरंभी त्यांनी बंगाल आणि पंजाब मधल्या निकटवर्ती मित्राबरोबर गुप्त रितीने देशातून निसटून रशियात कसे जाता येईल याबद्दल चर्चाही केली होती. मेजर जनरल शहानवाज खानांच्या आठवणीनुसार सुभाषचंद्रांनी गांधीजींसोबत आपल्या योजनेची चर्चा केली होती. युद्धकाळात इंग्रजांच्या तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा काही भारतीय पुढा-यांनी हिंदूस्थानातून निसटून जावे, इंग्रजांच्या शत्रूच्या मदतीने सैन्य उभारावं आणि हिंदुस्थान मुक्त करण्यासाठी यावं अशी कल्पना आपण गांधींसमोर मांडली होती असं सुभाषबाबूंनी शाहनवाझ खानांना सांगितलं होतं. (शाहनवाझ खान, माय मेमरीज ऑफ आयएनए ऍंड इट्स नेताजी, पृ.१७)

सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.

तेव्हा सावरकरांच्या गंभीर सूचनेमुळेच क्रांतिकार्याची धुरा अंगावर घेण्याची कल्पना नि स्फूर्ती सुभाषचंद्रांना झाली असली पाहिजे, हा समज सावरकर भक्तांनी दुरुस्त करुन घेणे गरजेचे आहे. 

Wednesday, March 7, 2012

घरगुती सावरकर

सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज...
.
सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत.

रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती.

कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्‍या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे.

सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची.
रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही.

सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत.

विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले.
सावरकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते.
त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत.

सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.

सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता.
- भोचक

-------------

चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय?
फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात.
जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते.
अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व.
सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व.
याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.)
त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.)
थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.)
- पंडित गागाभट्ट.

------------

(१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता.
त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.
हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....)
(२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे.
पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी.
अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.)
- इन्द्र्राज पवार

सुभाषचंद्रांनी जपानची मदत घेणं योग्य होतं का ?

सुभाषबाबूंच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेत नाही.तशी शंका घ्यायची योग्यता मिपावरील कोणाही सभासदाची असेल असे वाटत नाही, निदान माझी तरी नाही.पण तरीही त्यांच्या उद्देशाविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की जपानची मदत घेऊन भारत स्वतंत्र करायच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन मला तरी करता येत नाही.


जपानी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला मदत करत होते.पण जपान्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांचे इरादे इतके नेक असतीलच असे १००% खात्रीने म्हणता येत नाही.जपान्यांना खरा रस होता पॅसिफिकमध्ये साम्राज्यविस्तार करण्यात.त्यासाठी त्यांनी सुरवात केली हवाई बेटातील पर्ल हार्बरवर हल्ला करून आणि दक्षिण पूर्व आशियात सिंगापूर-इंडोनिशिया या भागातही साम्राज्यविस्तार केला.चीनमधील नानकिंग हे बंदर ताब्यात असणे जपान्यांना महत्वाचे ठरले असते म्हणून त्या शहरावर जपान्यांनी हल्ला केला आणि तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले.त्याला रेप ऑफ नानकिंग म्हणतात.

जपान्यांनी ब्रम्हदेशातही १९४२ मध्ये बऱ्यापैकी inroads केले होते.आझाद हिंद सेना स्थापन झाली १९४२ मध्ये-- साधारण त्याच सुमारास आणि सेनेला बऱ्यापैकी आकार आला नंतरच्या काळात. १९४२ मधील सुरवातीचे ब्रम्हदेशावरील आक्रमण जपानी सैन्यानेच आझाद हिंद सेनेच्या मदतीशिवाय केले होते. तिथे जपान्यांना अनुकूल असे फारसे काही नाही.हवा पण रोगट.नैसर्गिक साधनसामुग्री पण फारशी नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की तरीही ब्रम्हदेशात जपानी का घुसले असावेत? त्याची माझ्या मते कारणे दोन: एक तर ब्रिटिशांविरूध्द strategic depth मिळवायला किंवा पूर्वोत्तर भारतातून बंगालमध्ये घुसायला. Strategic depth कशी?तर जितके इंग्रज जपान्यांच्या area of interest पासून दूर तितके जपान्यांना चांगले.दुसरे म्हणजे बंगालमध्ये कलकत्ता-चितगाव सारखी बंदरे आणि बंगालमध्ये होणारा तांदूळ-ताग अडी-अडचणीच्या वेळी उपयोगी येईल असे जपान्यांना वाटले असेल तर त्यात आश्चर्य वाटू नये.

तेव्हा अधिक strategic depth मिळवायला किंवा भारतातील नैसर्गिक सामुग्रीचा उपयोग करून घ्यायला जपानी भारतात आले असते तर कलकत्ता-चितगावची अवस्था नानकिंगपेक्षा वेगळी झाली असती असे मला वाटत नाही.आणि त्याच प्रक्रियेत त्यांनी आझाद हिंद सेनेला मदत केली याचा हेतू नक्की काय होता?इंग्रजांशी परस्पर आझाद हिंद सेना लढली तर आपल्या डोक्यामागची कटकट कमी हा व्यावहारिक हेतू की भारताला मदत करायची genuine इच्छा?अर्थात हा जरतरचा मामला आहे आणि त्याविषयी नक्की सांगता येणार नाही.पण जपान्यांचा पूर्वेतिहास लक्षात घेता जपान्यांपेक्षा इंग्रज खूपच परवडले असे म्हणायला हवे.सुभाषबाबूंचा हेतू प्रामाणिक होता यात शंका नाही पण भारतात आतपर्यंत घुसलेले जपानी आयत्या वेळा उलटले असते तर?मग एकाबाजूने इंग्रज आणि दुसरीकडे जपानी अशा कात्रीत पकडले जायची शक्यता नव्हतीच का? मला वाटते ती भिती प्रत्यक्षात उतरायची किती शक्यता होती हे माहित नाही पण ती १% तरी असेल तरी was it worth to pay that price?

या कारणामुळे जपान्यांची मदत घेऊन स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करायला माझ्या पातळीवर तरी समर्थन नाही. मी अगदी पूर्णपणे चुकीचा असेन पण जपान्यांनी भारतात नानकिंगसारख्या कत्तली करणे या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा येतो.

----------
जपान्यांनी अंदमान-निकोबार बेटे जिंकली.नेताजींनी त्यांचे नामकरण शहिद आणि स्वराज्य असे केले.पण जपान्यांनी अंदमानातही काही प्रमाणावर कत्तली केल्याच होत्या. (संदर्भ: पान १०२-१०३ ) त्यात म्हटले आहे की इंग्रजांनी अंदमान-निकोबारचा ताबा मिळविण्यापूर्वी ७५० सामान्य लोकांची हत्या केली. १९४५ मधील अंदमानची लोकसंख्या लक्षात घेता ७५० हा आकडा तसा मोठाच नव्हता का?या संदर्भात मागे मी Japanese in Andaman & Nicobar Islands red sun over black water या पुस्तकाची गुगल बुक्समध्ये उपलब्ध असलेली काही पाने वाचली होती.त्या पुस्तकाची सगळी पाने उपलब्ध नाहीत कारण कॉपीराईटमुळे अनेक पाने दिसत नाहीत.तरीही उपलब्ध पानांमधील संदर्भातून कळते की अंदमानमधील हॅवेलॉक बेटावर जपान्यांनी अत्याचार केले होते.आणि या पुस्तकाचे लेखक कोण?तर खडकवासल्याच्या एन.डी.ए मधील प्राध्यापक! तेव्हा हिटलर-जपान्यांच्या वाईट गोष्टी हजार पटीने वाढवून सांगायच्या आणि आपल्या वाईट गोष्टींविषयी काही बोलायचे नाही हा इंग्रज-अमेरिकनांवर होणारा आरोपही त्यांच्यावर करता येणार नाही.


एकूणच काय?की जपान्यांचा उद्देश होता आपल्याला पाहिजे त्या भागात हातपाय पसरायचे आणि कोणी विरोध करेल तर सरसहा कत्तली करायच्या मग ते नानकिंग असो, मांचुरिया असो की अंदमान.समजा जपानी (माझ्या मते) त्यांच्या इंटरेस्टच्या क्षेत्रात--पूर्वोत्तर भारत आणि बंगाल (बांगलादेशासकट) घुसले असते तर आणखी काही वेगळे झाले असते असे म्हणायला काय जागा आहे?

अंदमानातील लोकांच्या हाल-अपेष्टा नेताजींपर्यंत पोहोचल्या होत्या की नाही याची कल्पना नाही.तशा त्या पोहोचल्या असत्या तर ते नक्कीच गप्प बसले नसते.आणि त्या बातम्या नेताजींना समजल्या असतील तर जपान्यांना विरोध करण्याइतकी आझाद हिंद सेना सक्षम नव्हती या कारणाने नेताजी हतबल होते का?अशा जपान्यांच्या हातात कोलीत देणे योग्य होते का?कदाचित त्या काळी अंदमानात काय झाले हे त्यांना कळले नसेलही पण १९३६-३७ पासून जपान्यांनी व्यापलेल्या मांचुरियातही आणि नंतरच्या काळात व्यापलेल्या पॅसिफिकमधील प्रदेशातही काय झाले हे पण १९४२-४३ मध्ये माहित नव्हते? आणि समजा त्या काळी ते कळले नसेल तरीही आज या सगळ्या घटना कळल्यानंतरही केवळ सशस्त्र क्रांतीला समर्थन (किंवा गांधींच्या मार्गाला विरोध) म्हणून आंधळेपणाने जपानची मदत घ्यायचे समर्थन आपण का करतो?

त्यामुळेच नेताजींविषयी पूर्ण आदर बाळगत मी म्हणतो की मला त्यांचा जपान्यांची मदत घ्यायचा मार्ग मान्य नाही.
------------
जपानने मांचुरियावर १९३० च्या दशकातच पूर्वी (मला वाटते १९३२-३३ मध्ये) हल्ला केला होता त्यातूनच जपानची साम्राज्यवादी महत्वाकांक्षा पूर्णपणे लपून राहिलेली नव्हती.तसेच मुसोलिनीचे ऍबिसिनीया (इथियोपिया) वरील आक्रमण १९३५-३६ चे.स्पॅनिश यादवी युद्ध १९३५-१९३६ च्या दरम्यानचे.जनरल फ्रॅन्कोने स्पेनची सत्ता ताब्यात घेतली याचा १९३६ च्या फैजपूर कॉंग्रेसमध्ये निषेधही झाला होता.आणि फ्रॅन्कोला हिटलरने मदतही केली होती हे पण लपून राहिलेले नव्हते.तेव्हा फॅसिस्ट शक्तींविरोधात कॉंग्रेसची भूमिका पहिल्यापासून होती असे म्हणायला नक्कीच वाव आहे. हिटलरने ऑस्ट्रीया घशात घातला मार्च १९३८ मध्ये.तेव्हा या सगळया पार्श्वभूमीवर नानकिंगमधील अत्याचार होते.ती isolated घटना नव्हती की त्याचा फारसा कुठे उल्लेख होणार नाही.

पंडित नेहरू हॅरो आणि केंब्रिजमध्ये शिकलेले होते.ब्रुसेल्समधील साम्राज्यवाद विरोधी परिषदेत त्यांनी भाग घेतला होता.तसेच रशियन राज्यक्रांतीपासून अनेकविध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास नक्कीच होता.मार्च १९३८ मध्ये पंडित नेहरूंचा लंडनमधील ट्रॅफल्गार स्क्वेअरमध्ये भाषण करतानाचा फोटो मी नेहरूंचे चरित्र वाचले त्यात आहे.म्हणजे मार्च १९३८ मध्ये नेहरू लंडनमध्ये हजर असतील तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नानकिंगच्या अत्याचाराचा अजिबात थांगपत्ता त्यांना नसेल हे जरा कठिणच वाटते. तसेच नेताजी स्वत: इंग्लंडमधून आय.सी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.तेव्हा त्यांनाही आंतरराष्ट्रीय perspective नक्कीच होता आणि त्यांना या घटनांचे गांभीर्य कळले नसेल असे म्हणता येणार नाही.इतक्या घटना एकामागोमाग एक घडत असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असेल यावर विश्वास कसा ठेवायचा?त्यांना हिटलरचे Concentration camps माहित नसतील पण जपान्यांनी अत्याचार केले आहेत याचीही त्यांना कल्पना आली नसेल?

बरं जे काही झाले ते झाले.नेताजींनी जे काही केले ते उदात्त भावनेने केले.पण कदाचित नेताजींना माहित नसलेल्या गोष्टी आज माहित झाल्या आहेत.तरीही आपण या मुद्द्यावर का अडून राहतो?

पंडित नेहरू म्हणाले होते की आझाद हिंद सेना भारतात आली तर त्याचा मी तलवारीने विरोध करेन.त्यांच्या या वाक्याची थट्टा उडविणे सोपे आहे.अगदी अविनाश धर्माधिकारींनीही त्याबद्दल नेहरूंवर टिका केली आहे.पण त्या सेनेच्या संगतीने जपानी भारतात घुसतील अशी भिती नेहरूंना वाटली असेल का?नक्की सांगता येणार नाही.पण तशी भिती वाटणे अगदीच निराधार नाही.

जपान्यांनी जे नानकिंगमध्ये केले, अंदमानात केले, इतर अनेक ठिकाणी केले तेच आझाद हिंद सेनेबरोबर भारतात घुसून केले नसतेच असे म्हणायला आधार कोणता?तेव्हा त्या प्रयत्नाला अपयश आले ही एका अर्थी चांगली गोष्ट झाली का?आणि परत वरचाच प्रश्न: १९४२-४३ मध्ये नेताजींनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन भारताचे हित लक्षात घेऊनच सगळा त्याग केला.पण नवीन माहिती आपल्याला कळली आहे त्यावरून जपान्यांशी संगत म्हणजे असंगाशी संग नव्हती का?

परकियांची भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत घेण्यात काहीही गैर नाही.पण त्या परकियाचा आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नको हा महत्वाचा मुद्दा का डावलला जात आहे?नाहीतर भारतीयांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जपानी (किंवा जपान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतीय) इंग्रजांवर हल्ला करणार.ते यशस्वी झाले तर जपान्यांनाही भारतात इंटरेस्ट असल्यामुळे (याची कारणे आधी मांडलेली आहेत. तसेच ब्रम्हदेशापर्यंत थडकलेले जपानी अचानक भारतीय सीमेवर स्तब्ध उभे राहतील असे मानायचेही काही कारण नाही.त्यातही नेताजींनी मनुष्यबळ भारतीयांकडून उभे केले असले तरी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे त्यांना कुठून येत होती?म्हणजे जपानवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे आले आणि त्यातच जपानचा भारतीय प्रदेशातील इंटरेस्ट हे लक्षात घेता त्याचे परिणाम गोड झालेच असते असे मानायला तुम्हाला वाटते तितका आधार आहे असे वाटत नाही.

त्यातही मला वाटते की परकियांची मदतच घ्यायची तर वेळ पडल्यास रशियाची मदत घेतली असती तर ते जपानची मदत घेण्य़ापेक्षा अधिक श्रेयस्कर ठरले असते. अर्थात त्या वेळी रशिया आपल्याला मदत करायच्या परिस्थितीत नव्हताच पण समजा असता तरी रशियाला भारतात इंटरेस्ट होता याचा पुरावा काय? तसेही रशिया अगदी शेवटपर्यंत इंग्लंडचा शत्रू राहिला असता तरीही चीन हा महाकाय देश ओलांडून भारतात ते यायची शक्यताही नव्हती. तेव्हा:
सर्वात महत्वाचे की ज्या परकियाकडून आपण मदत घेणार आहोत त्याचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नकोत. कत्तली हा मुद्दा महत्वाचा आहेच पण तरीही एखाद्या परकियाचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसतील (उदा. रशिया) तर त्यांनी इतरत्र केलेल्या कत्तलींची डायरेक्ट झळ भारताला लागायची शक्यता कमी होती. जपानबद्दल हे म्हणता येते का?

जपानी Comfort women याविषयी माहिती गोळा करा म्हणजे अनेक काळ्याकुट्ट गोष्टी कळून चुकतील.जर जपानी सैन्याने चीनमध्ये अनेक स्त्रियांना Comfort women म्हणून नेले तर त्यांनी ते भारतात केले नसते हे म्हणायला काय आधार आहे?दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रज सद्गुणाचे पुतळे नक्कीच नव्हते पण थोड्या काळात त्यांनी घेतलेल्या बळींची संख्या आणि क्रौर्य या बाबतीत ते इंग्रजांपेक्षा कितीतरी पुढे होते.तेव्हा माझा म्हणायचा मुद्दा एकच की इंग्रज वाईट हे मान्य पण त्यांना घालवायला त्यांच्यापेक्षा दहापट वाईट आणि कदाचित अधिक बलिष्ठ शत्रूला घरात घेतले तर त्याचे परिणाम चांगलेच होतील हे म्हणायला काय आधार आहे?

जपानचा नक्की हेतू काय होता?इंग्रजांविरूध्द strategic depth मिळवायला की भारताला स्वतंत्र करायला genuine मदत करणे? मला वाटते की इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून शक्य तितके दूर ठेवावे या कारणासाठी जपानचा भारतात इंटरेस्ट होता.आणि भारतीयांचा इंटरेस्ट इंग्रजांना हरविण्यात होता त्यामुळे एक सोयीचे लग्न (marriage of convenience) म्हणून ते एकत्र आले.तसेच जपान इंडोचायना, मलाया, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी लढाईत गुंतलेला असल्यामुळे भारताच्या आघाडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि इंग्रजांना पूर्ण भारतातून कायमचे हाकलवणे हे फारच कठिण आहे हे त्यांना कळले नसेल असे मला तरी वाटत नाही.तेव्हा विजय मिळाला असता तरी जपानी सैन्य इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी भारताच्या भूभागात तळ ठोकून राहिले असते यात अशक्य काय?तेव्हा जपान्यांना नक्की काय हवे होते?एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांचे आणि आपले मार्ग आणि ध्येय सारखे होते हे मान्य.पण पुढे काय?
तसेच अंदमानात जपान्यांनी काय केले हे एका प्रतिसादात लिहिले आहे.तेच त्यांनी भारताच्या इतर भागात केले नसते याला आधार काय या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही.

जपान्यांनी इतरत्र जो धुमाकूळ घातला त्यावरून भारतातही त्यांनी काही वेगळे केले असते असे मानायला जागा नाही.भारतावर त्यांची राजवट आली नाही हे आपले भाग्यच म्हणायचे.भारतावर ज्या ज्या परकियांचे आक्रमण झाले त्यात अलेक्झांडर सर्वात सुसंस्कृत म्हटला पाहिजे.इंग्रज सुसंस्कृत नसले तरी मोंगल,हूण यांच्यापेक्षा बरेच सोबर होते.लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली त्यावेळीही त्यांच्यावर कोर्टात रितसर खटला दाखल करून त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी देऊन इंग्रज कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली.तसेच सर्व क्रांतिकारकांना फाशी दिले नाही.अनेकांना जन्मठेपेची शिक्षाही केली.तेव्हा विरोध करतोस ना?मग घालतो गोळी अशी तालिबानी किंवा जपानी राजवट त्यांची नव्हती.म्हणूनच इंग्रजांना घालवायला त्यांच्याहून क्रूर जपान्यांची मदत घ्यायला माझा विरोध आहे.
बाकी इंग्रज राज्याचा मी समर्थक नक्कीच नाही.इंग्रज राज्याचे काय किंवा इतर कसलेही जे काही चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम आहेत ते बघावेत आणि त्यावरून मत बनवावे असे मला वाटते.इंग्रज राज्याचे वाईट परिणाम भारतावर झाले हे कोणी नाकारू शकतच नाही.पण एकूण जपान्यांची वर्तणूक बघता इंग्रज म्हणजे lesser evil होते हे माझे मत कायम आहे.आणि असे मत मांडले तर इंग्रज राज्याचा भाट असल्याचा आरोप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष.

जपानी अत्याचार करण्यात नाझींसारखेच क्रूर होते.त्यांच्या तावडीत भारताचा काही प्रदेश काही काळ राहणे म्हणजे दररोज जालियनवाला बागला लाजवतील अशी हत्याकांडे व्हायला आमंत्रणच नाही का?
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे ठिक आहे.पण ते कधी?शत्रूलाही आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसेल तर.जपान्यांना आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नव्हता का?तसे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे असे वाटत नाही.आणि अशा शत्रूच्या शत्रूला जवळ करून छावणीत उंट घेण्याप्रमाणे नाही का?
इंग्रजांचे सैन्य फोडून नेताजींनी इंग्रज सत्तेला मुळातून हादरा दिला हे कोणी अमान्य करूच शकणार नाही.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी संग करण्याबद्दल आहे.

- गिरिश खरे