Saturday, August 19, 2017

गांधीं आणि कैसर ए हिंद

१. पहिले महायुद्ध ऑगस्ट १९१४ मध्ये सुरू झाले. जानेवारी,१९१५ त गांधी भारतात आले. कायमसाठी.

२. दर वर्षी ब्रिटिश शासन "कैसर ए हिंद" ही पदवी देत. तुकोबा होळकर, पंडिता रमाबाई इ. अनेक लोकांना ही पदवी देण्यात आलेली आहे. भारतीयांच्या कल्याणासाठी केलेल्या कामगिरीसाठी ही पदवी/पदक देण्याचा प्रघात होता.

३. गांधींनी पहिल्या महायुद्धात दक्षिण आफ्रिकेत भारतीय सैन्यासाठी ambulance services - सेवा/शुश्रूषा चे काम केले. त्यासाठी त्यांना १९१५ मध्ये हे पदक देण्यात आले.

४. आफ्रिकेतल्या कार्याच्या वेळेपर्यंत गांधी कमालीचे स्वामिनिष्ठ होते. ब्रिटीश साम्राज्याचे नागरिक ह्या नात्याने आपल्याला सगळे हक्क मिळाले पाहिजेत असा त्यांचा त्यावेळी मुख्य मुद्दा होता. पुढे भारतात आल्यावर ते प्रखर विरोधक बनले.

५. १९१९ सालच्या आसपास झालेल्या घटना - सायमन कमिशन, रौलट कायदा, जालियानवाला बाग हत्याकांड, मोन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेली निराशा ह्यामुळे गांधींनी असहकार चळवळ सुरू केली गेली.

६. असहकार आंदोलनाच्या कार्यक्रमाचा एक भाग बहिष्कार हा होता. त्यानुसार पदव्या/पदके परत करणे, कोर्ट, सरकारी/शैक्षणीक संस्थावर बहिष्कार टाकला गेला. गांधींनी त्यानुसार आपली पदवी परत केली.

No comments:

Post a Comment